दौलताबाद किल्ल्याचा इतिहास । Daulatabad Fort History in Marathi

दौलताबाद किल्ल्याचा इतिहास । Daulatabad Fort History in Marathi

दौलताबाद किल्ल्याचा इतिहास । Daulatabad Fort History in Marathi : महाराष्ट्र राज्यात अनेक किल्ले आहेत.

त्या किल्ल्यां पैकी देवगिरीचा किल्ला म्हणून आपली ओळख निर्माण करणारा दौलताबाद किल्ला. दौलताबाद किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. कारण हा किल्ला यादव कालीन ऐतिहासिक किल्ला आहे.

आज आपण याच दौलताबाद किल्ल्याचा इतिहास ( Daulatabad Fort History in Marathi ) बघणार आहोत

आणि या दौलताबाद किल्ल्याचा इतिहास ( Daulatabad Fort History in Marathi ) बद्दल आज आपण बरीचशी माहिती जाणून घेणार आहोत.

दौलताबाद किल्ल्याचा इतिहास । Daulatabad Fort History in Marathi

चला तर मग जाणून घेऊयात दौलताबाद किल्ल्याचा इतिहास ( Daulatabad Fort History in Marathi ).

दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून हा किल्ला यादव कालीन ऐतिहासिक किल्ला आहे. दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव हे देवगिरी किल्ला असे होते. देवगिरी किल्ल्याला 28 नोवेंबर इ.स. 1951 साली ” राष्ट्रीय संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित करण्यात आले.

  • दौलताबाद किल्ल्याचा इतिहास ( Daulatabad Fort History in Marathi ) :

दौलताबाद हा किल्ला अतिशय मजबूत आणि बुलंद आहे. या किल्ल्याचा इतिहास हा यादव कालीन काळातील आहे. ह्या किल्ल्याची उंची सुमारे 2975 फूट एवढी आहे. आणि हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारा मध्ये मोडतो.

दौलताबाद किल्ल्याच्या इतिहासा बद्दल सांगायचे म्हणजे हा किल्ला यादव कालीन काळातील एका ऐतिहासिक किल्ल्यां पैकी एक आहे. दौलताबाद हे महाराष्ट्रातील एक शहर आहे याचे प्राचीन नाव देवगिरी होते. म्हणून या किल्ल्याला देवगिरी किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते.

मधुमद बिन तुघलक त्यांनी दौलताबाद किल्ल्याला आपली राजधानी बनवली. तसेच वहामनीची सुद्धा राजधानी दौलताबादचा किल्ला होता.

दौलताबाद किल्ला हा मध्ययुगीन काळात डेक्कन चा सर्वात शक्तिशाली किल्ला होता. दौलताबाद किल्ला हा एकमेव असा किल्ला आहे, जो कोणालाही जिंकता आला नाही. दौलताबाद किल्ला हा डेक्कनच्या प्रदेशातील सर्वात किल्लेदार किल्ला आहे.

देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद किल्ला हा इ.स. 1187 मध्ये यादव राजा भिल्लम यांनी बांधला होता. दौलताबादच्या किल्ल्याचे सामरिक व सामर्थ्यवान बांधकाम हे देशातील संरक्षित किल्ल्यांपैकी एक आहे.

दौलताबाद हे शंकूच्या आकाराचे टेकडीच्या माथ्यावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या खालच्या भागात गवत आणि पाणी आहे व या मध्ये मगरीं चे साम्राज्य आहे जेणेकरून शत्रू सहज आत जाऊ शकणार नाही.

दौलताबाद किल्ल्यावर पंच धातूंनी बनलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवलेली आहे. असे म्हणतात की, त्या तोफे मध्ये एक संपूर्ण शहर उध्वस्त करण्याची शक्ती आहे. व या तोफे वरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत लिपीत आहे.

तुघलक राजवटीच्या काळात, दौलताबाद किल्ल्याला वेग- वेगळ्या मार्गांनी बळकटी दिली गेली आणि या किल्ल्याच्या संरक्षणा साठी सुमारे 5 किलो मीटर लांबीची मजबूत भिंत बांधली गेली आहे.

शत्रूंचा प्रवेश रोखण्यासाठी मोक्याचा उपाय म्हणून किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर अनेक कोडे सोडले आहेत. तुघलक घराण्याचा कारकिर्दीत, किल्ल्याच्या आज 30 मीटरची चांद मिनार टॉवर बांधला आहे.

  • दौलताबाद किल्ल्याचे बांधकाम :

दौलताबाद किल्ला सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या टेकडीवर बांधलेला आहे. या किल्ल्याच्या संरक्षण यंत्रणेला तीन तटस्थ भिंती आहेत. त्यामध्ये पुरेसे अंतर ठेवून गेट्स आणि किल्ले आहेत.

दौलताबाद किल्ला ज्या ठिकाणी पसरलेला आहे. तेथील किल्ल्याचे क्षेत्रफळ अंदाजे 94.83 हेक्‍टर येवढे आहे. दौलताबाद किल्ल्यात पायरी, विहीर, बरदरी, जलाशये, मिनार, हम्मम, विविध वाड्या, मंदिरे आणि मशिदी यासारख्या 10 अधुरी खडकांच्या कापाच्या गुहे शिवाय अजून कितीतरी वस्तूंचे प्राचीन बांधकामे आहेत.

दौलताबाद किल्ला हे धोरणात्मक स्थान आणि मजबूत संरक्षणात्मक सुरक्षेमुळे अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो.

  • दौलताबाद किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाण :

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला दौलताबाद किल्ला पर्यटकांसाठी बघण्यासाठी एक प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. किल्ल्याच्या आत मध्ये पर्यटकांना बघण्यासाठी अनेक ऐतिहासिक दृश्य आहेत. विशेष म्हणजे किल्ल्याचे बांधकाम बघण्या सारखे आहे.

दौलताबाद किल्ल्या वरील जरजारी झार बक्ष याच्या थडग्याकडे, कागदाचा पुर आणि भद्र मूर्ती मंदिर पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. पेपर पुरा त्याच्या पेपर मेकिंग साठी प्रसिद्ध आहे.

किल्ल्या मध्ये पंचधातूंनी बनलेली एक प्राचीन तोफ आहे. किल्ल्या च्या सभोवती गर्जरी धार बख्श या आदरणीय सुफी संतांचे स्थान आहे.

ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेश द्वाराची रचना अशी योजनेत केलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राहील. किल्ल्याच्या एका बाजूला 10 किलो मीटर पर्यंत भिंत पसरली आहे.

या किल्ल्यात प्रवेश करताना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत.

या दरवाजातून प्रवेश केल्यावर प्रत्येक ठीकठिकाणी गल्लीत पहारेकर्‍यां साठी कोठड्या बांधण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या कोठड्या मध्ये काही जुनी न वारण्याजोगी अवजारे ठेवण्यात आलेली आहे

  • दौलताबाद किल्ल्यावर पोहोचण्याचा मार्ग :

दौलताबाद किल्ला हा औरंगाबाद शहरापासून 16 किलो मीटरच्या अंतरावर वसलेला एक ऐतिहासिक व प्राचीन किल्ला आहे.

आपण या किल्ल्यावर विमान, रेल्वे आणि रस्ता या तीनही मार्गांनी तेथे पोहोचू शकतो.

  • 1. रेल्वे मार्ग :

औरंगाबाद शहराचे रेल्वे स्टेशन हे दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे आणि ते किल्ल्यापासून जवळ- जवळ 15 ते 20 किलो मीटरच्या अंतरावर आहे. रेल्वे स्टेशन मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.

  • 2. बस मार्ग :

औरंगाबाद किल्ल्यावर जाण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे औरंगाबाद ते दौलताबाद पर्यंत बस पकडून जाऊ शकतो. किंवा टॅक्सी चा वापर करू शकतो.

  • 3. हवाई मार्ग :

औरंगाबाद मधील दौलताबाद किल्ल्यावर जाण्यासाठी तिसरा मार्ग म्हणजे हवाई मार्ग किल्ल्या पासून 22 किलो मीटर अंतरावर विमानतळ आहे. हे विमानतळ हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment