जर वीज नसती तर मराठी निबंध । Vij Nasti Tar Marathi Nibandh

जर वीज नसती तर मराठी निबंध । Vij Nasti Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे .या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” जर वीज नसती तर मराठी निबंध । Vij Nasti Tar Marathi Nibandh “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

जर वीज नसती तर मराठी निबंध । Vij Nasti Tar Marathi Nibandh

उन्हाळ्याचे कडक दिवस होते, मी माझ्या सर्व कुटुंबासोबत बसून टीव्ही बघत होतो. नवनवीन सिनेमे, कार्टून  बघत दिवस छान चालले होते. कुठेतरी अचानक शॉर्टसर्किट झाला आणि आमच्या येथील संपूर्ण विज तात्काळ बंद करण्यात आली.

उन्हाळाच्या कडक दिवस त्यात विज पण नाही त्यामुळे सर्व पंखे, कुलर बंद पडली व आम्ही सर्वजण घामाघुम झाले.

तेवढा शेजारचे रामुकाका आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की कुठेतरी अचानक  शोक सर्किट झाल्याने पूर्ण शहराचे लाईट दोन दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे,

त्यांचे हे बोलणे ऐकून मी तर डोक्यालाच हात लावला कारण कडक उन्हाचे दिवस होते, उन्हाने जीव कासावीस होत होता अशा अवस्थेत वीज नाही म्हणजे सर्व  पंखे ,कुलर  बंद पाडणार सगळीकडे  अंधार पसरनार . कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचे व्यवसाय ठप्प होणार.

अशा अवस्थेत मला विचाराला थोड्या वेळा वीज गेली तर आपले असे हाल होत आहे जर ही वीज नसती तर…….

खरच ! विज नसती तर ? या विचारानेच मी एकदम धस्स झालो. वीज नसती तर सर्वत्र रात्रीचा अंधार दूर करणारे दिवे लागलेच नसते ,मात्र रात्रीच्या काळोखात अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसले असते.

रस्त्यावर, घराघरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असते, अश्या आवस्थेत मेणबत्ती, दिवा ,समई यांचा वापर बंधनकारक ठरला आसता. रस्ते, महागडी हॉटेल मध्ये प्रकाशाची दिवाळी बघायलाच मिळाली नसती. लग्न समारंभा सारखे मोठे कार्यक्रम अंधारात साजरे करावे लागले असते.

आपल्या जीवनात विजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलेही काम करायचे म्हणजे विजेची आवश्यकता भासते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वीज आपल्याला गरजेचे आहे.

आज घरातील कुठलेही काम करायचे म्हणजे वीज ही गृहिणीची एक सखी बनवून त्यांना मदत करते. जसे की दळणे, कापणे, कपडे धुणे, घराची स्वच्छता करणे अशा प्रत्येक कामांमध्ये वीज मोलाची भूमिका बजावते.

त्याप्रमाणेच अन्न साठवण ठेवणारा फ्रिज, मायक्रोवेव्ह, मिक्सर, वॉशिंग मशीन, व्याक्युम क्लिनर ही सर्व उपकरणे चालवण्यासाठी विजेची गरज भासते. स्वयंपाक घरातील बरेच कामासाठी विजेची आवश्यकता आहे. काही ठिकाणी तर विजेच्या चुली वापरून स्वयंपाक केला जातो.

आजच्या आधुनिक जगात आपण बरीच प्रगती केली आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आले आहे. व नवीन शोधामुळे नवीन मशिनरी आणि यंत्रांचा शोध लागला आहे. आज प्रत्येक उद्योगधंद्यांची यंत्र आणि मशनरी फिरतात ते फक्त विजेच्या सामर्थ्यावर. त्यामुळे औद्योगिक क्रांती घडण्यामागे सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे विजेचा. च्या्ाााा.

वीजे मुळे आपल्या देशाची  एवढी प्रगती झालीच नसती. उद्योग धंदे नी आज जी प्रगती केली आहे ती या विजेच्या बाळावर मग वीज नसती तर ही प्रगती शक्य झाली असती का ?

प्रत्येक क्षेत्रामध्ये वीज महत्त्वाची भूमिका बजावते. मानवाला नवीन जीवन दान देणारा वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर विजेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्येम जे काही शस्त्रक्रिया होतात त्यासाठी वीज आवश्यक असते.

जर बाळ अशक्त असेल तर त्याला इनक्यूबेटर मध्ये ठेवले जाते,त्यासाठी वीज हवीच असते. वैद्यकीय क्षेत्रातील मोठे मोठे ऑपरेशन करण्यासाठी मशिनरी वापरल्या जातात सर्व मशनरी विजेवर चालतात. थोडक्यात विजेमुळे एखाद्याचे प्राण वाचण्यात मदत होते.

मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे वर्कस हे कम्प्युटरच्या सहाय्याने काम करतात. कंप्यूटर चालवण्यासाठी आपल्याला विजेची आवश्यकता लागते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विजेला खूप महत्त्व आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्व कामे मोबाईल च्या साह्याने करतो, मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल चालवण्यासाठी त्याला चार्जिंग ची आवश्यकता असते. आणि हे चार्जिंग होते त्या विजेमुळेच.

अर्थात विजे मुळे आपल्या जीवनाचे एक पानही हलू शकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हामुळे घामाघूम होतो, अशा अवस्थेत आपल्याला मदत करतात पंखा ,कुलर ,एसी इत्यादी उपकरण. पण ही उपकरणे चालवण्यासाठी आपल्याला गरज भासते ते म्हणजे विजेची.

आपल्याला कुठलेही काम करायचे म्हणजे सर्वप्रथम वीज आवश्यक असते. तसेच दळणवळणाचे मुख्य साधन मानले जाणारी रेल्वे व्यवस्था एकाच वेळी अनेक शहरांना जोडलेले असते ती म्हणजे याच उच्च दाबाच्या  विजेच्या तारांचा द्वारे, आणि  या रेल्वेमुळे  आपल्या राज्याला अधिक महसूल प्राप्त होतो.

थोडक्यात विजेमुळे माणूस आसह्या होतो, हे म्हणणे चुकीचे ठरू शकत नाही. मी जेवढे आपल्याला उपयुक्त आहे तेवढेच ते प्राणघातक सुद्धा आहे. माणसाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारी ही वीज अनेकदा प्राणघातक सुद्धा ठरू शकते. विजेच्या उपकरणांचा योग्य वापर आणि त्याची अयोग्य हाताळणी यामुळे विजेचा धक्का लागण्याची  शक्यता असते. काहीवेळा विजेचा धक्का तू मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

शॉक सर्किट्स मुळे होणारी हानी, यामुळे वीज धोकादायक वाटू शकते. त्यामुळे आपल्या जीवनातील विजेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा योग्य तो वापर करणे गरजेचे आहे. तसेच काही लोक गरजेपेक्षा जास्त विजेचा वापर करतात. दिवसाच्या वेळी घरांमध्ये दिवे लावलेले असतात. यामुळे वीज वाया जाते.

” बिजली हे शक्ती से व्यर्थ ना गमाओ,

जितनी जरूरत है उतनी जलाओ”

विज ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जेवीला उगाचच वाया ना घालवता त्याचा योग्य वापर करणे हे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

दैनंदिन जीवनातील कित्येक कार्य आपण विजेच्या बाळावर करतो. त्यामुळे विज ही अापल्या जीवनासाठी अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे विजेचा सुयोग्य  आणि गरजेपुरता वापर हा आपल्या सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकतो. आपल्या अशा वागण्याने आपल्यासमोर  वीज नसती तर?  असा प्रश्न उद्भवू शकणार नाही.

तर मित्रांनो ! ” जर विज नसती तर मराठी निबंध । Vij Nasti Tar Marathi Nibandh “   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

 ” विज नसती तर मराठी निबंध । Vij Nasti Tar Marathi Nibandh “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले  असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment