निरक्षरता एक शाप मराठी निबंध I Niraksharta Ek Abhishap Marathi Nibandh

निरक्षरता एक शाप मराठी निबंध I Niraksharta Ek Abhishap Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” निरक्षरता एक शाप मराठी निबंध I Niraksharta Ek Abhishap Marathi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

निरक्षरता एक शाप मराठी निबंध I Niraksharta Ek Abhishap Marathi Nibandh

निरक्षरता एक शाप मराठी निबंध :

आपण आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही वर्षानंतर या शाळेमध्ये घालतो. कारण शिकून मोठे होऊन तो एक शिक्षित व्यक्ती म्हणून समाजामध्ये ओळखला जावा.

प्रत्येकाला वाटते की आपण शिक्षित असावे आपले स्वतःचे काहीतरी अस्तित्व असावे. त्यासाठी प्रत्येक जात शिक्षण या मार्गाचा अवलंब करतात आणि शिक्षित सुद्धा होतात. आपल्याकडील बहुतांश समाज हा आज शिक्षित असला तरी यातील काही जनताही आजही निरक्षित आहे.

निरक्षरता म्हणजे अक्षरांचे ज्ञान असलेला व्यक्ती. आजही आपल्या समाजामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांना अक्षराचे ज्ञान प्राप्त आहे. वर्णमाला च्या ज्ञानाशिवाय एखादी व्यक्ती वाचन-लेखन करू शकत नाही.ज्या व्यक्तींना समाजामध्ये लिहिता-वाचता येत नाही त्यांना अशिक्षित असे म्हणतात. अशिक्षित म्हणजेच थोडक्यात निरक्षर होय.

आजच्या जगात ज्ञान आणि विज्ञान यांचे वर्चस्व सर्वत्र पसरलेले पाहायला मिळतात. साहित्य, कला, विज्ञान, इतिहास, धर्म इत्यादींच्या उत्तम मुद्रित पुस्तके सहज रित्या उपलब्ध आहेत. परंतु समाजातील अशिक्षित व्यक्तींना काहीही उपयोग नाही.

पुस्तकात असलेल्या अनमोल ज्ञानाचा उपयोग अशा व्यक्तींना भोगता येत नाही. अशा व्यक्तींना वृत्तपत्रे आणि मासिके वाचता येत नसल्याने समाजात चालणाऱ्या चालू घडामोडी आणि देश-विदेशात होत असलेले बदल त्यांची माहिती नसते. असे व व्यक्ती कोणालाही पत्र लिहू शकत नाहीत आणि कोणाचे पत्र वाचण्यासाठी सक्षम नसतात.

अशा व्यक्तींना वाचनाच्या आणि लिहिण्याच्या बाबतीमध्ये दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.

दुर्दैवाने भारतामध्ये आजही अशा निरक्षर लोकांची संख्या जास्त पाहायला मिळते. भारतामध्ये निरक्षरता लोकांचे संख्या साक्षर लोकांपेक्षा जास्त आहे. आपल्या देशातील कोट्यावधी गावे आज सुद्धा निरक्षरतेचा अंधारात बुडालेली आहेत.

लोकांच्या निरक्षरतेचा परिणाम हा आपल्या देशावर होत आहे. कारण निरक्षर शेतकरी उत्पादन करण्यामध्ये मागे पडत आहेत, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जरा हे माहिती नाही त्यामुळे उत्पादनामध्ये घट होऊन देशाचे नुकसान होत आहे.

तसेच देशातील बहुतेक तरुण पिढी ही निरक्षर आहे. असे म्हणतात की, देशाचा तरुण पिढीवर देशाचे भवितव्य अवलंबून आहे मग देशाचे तरुण पिढी निरक्षर राहिली तर देशाच्या भविष्याचे काय होईल?

शहरी भागातील निरक्षर लोकांना प्राण्यांसारखे वागणूक दिली जाते. त्यांच्यावर अत्याचार केला जातो त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेतला जातो. ज्या देशातील बहुतेक नागरिक निरक्षर आहेत त्या देशाची प्रगती कशी होईल?

देशातील बहुतांश जनता ही अशिक्षित असल्यामुळे, देशवासियांमध्ये राष्ट्राबद्दल प्रेम आणि आदराची भावना राहिली नाही त्यामुळे देशातील निरक्षरता ही देशासाठी शाप बनत आहे. लोकांमध्ये विचार  शक्तीचा योग्य विकास होत नाही.

अशिक्षित लोक भ्रष्टाचार आणि विविध आण्णा यामध्ये सहजरीत्या अडकतात. निरक्षर समाजला  देशातील प्रत्येक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशिक्षित लोकांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी चे योग्य ज्ञान असल्याने असे लोक समाजासाठी एक आदर्श नागरिक बनू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी निरक्षरता एक शाप  बनते.

त्यामुळे आपल्या समाजातील बहुतांश लोकांना निरक्षरतेच्या शापातून मुक्त करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत. लोकांना निरक्षरतेचे शापातून  मुक्त करण्यासाठी सरकार आणि अनेक सामाजिक संस्था काम करीत आहेत.

तरीही निरक्षरता रोखण्याचे विशेष प्रयत्न करणे काळाची गरज आहे.  निरक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण हे ग्रामीण भागात पाहायला मिळते. त्यामुळे अशा ग्रामीण भागामध्ये आदर्श शाळांची स्थापना करायला हवी.

प्रौढ शिक्षणाचे वर्ग योग्य प्रकारे स्थापित केले पाहिजेत. माध्यमिक स्तरापर्यंत विनामूल्य शिक्षण प्रत्येक गावांमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेच प्रत्येक गावांमध्ये ग्रंथालय आणि वाचनालय कक्ष स्थापित केले पाहिजेत. अध्यापन साहित्य कमी किमती दरामध्ये उपलब्ध करून दिले पाहिजेत.

आपण केलेल्या सर्व उपाययोजनांमुळे आपल्या देशातील निरक्षरता एक शाप दूर होऊ शकतो. आपल्या प्रयत्नातून असा दिवस येईल जेव्हा भारतीय जनता ही निरक्षरते च्या शापापासून नक्कीच मुक्त होईल. संपूर्ण भारत एक दिवस नक्कीच साक्षर होईल आणि अशा भारताची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

तर मित्रांनो ! ” निरक्षरता एक शाप मराठी निबंध I Niraksharta Ek Abhishap Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” निरक्षरता एक शाप मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment